संस्कृतमध्ये एक प्रसिद्ध सुभाषित आहे,
अतिपरिचयदवज्ञा संततगमनादनादरो भवति ।
मलये भिल्लपुरंध्री चन्दनतरुकाष्ठमिंधनं कुरुते ॥
अगदी थोडक्यात सांगायचे तर अति परिचयाची एखाद्याचे मूल्य अथवा महत्व कमी होणे. प्रकाशाचेही काही प्रमाणात असेच झालेले आहे. प्रकाश हि आपल्या दैनिंदिन जीवनातील असामान्य प्रतिभा असलेली अतिसामान्य गोष्ट, अशीच अतिपरिचयेमुळे अवज्ञेस गेलेली. प्रकाश म्हणजे काय असे कोणाला विचारले तर "अहो ते नाही का ते, 'सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर' आहे ना त्यातला प्रकाश " असे उत्तर मिळेलही . पण प्रकाश म्हणजे नेमके काय? प्रकाश कशापासून बनला आहे? असे विचारले तर ??