02 June, 2014

तेलंगाना!- भारताचे २९ वे राज्य


१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. परंतु तत्कालीन भारतात असंख्य संस्थाने  होती. त्या पैकी काही संस्थाने राजी खुशीने भारतात विलीन झाली, मात्र काही संथानिकांनी आपला हेका सोडला नाहीस्वतःचे टिच भर संस्थान म्हणजे जणू एक सार्वभौम राष्ट्रच आहे अश्या अविर्भावात ते होते. त्या पैकी एक म्हणजे हैदराबादचा निजाम.