04 January, 2014

विकार!!!!

अपने मातृभूमि का त्याग करने कि इच्छा केवल दो प्रकार के व्यक्तिओंके ही मन मैं उत्पन्न हो सकती है. एक जिसके ह्रदय मैं केवल स्वार्थ भरा हो या फिर दूसरा जो अपने ही देश मैं स्वयं का स्थान प्रस्थापित करने मैं या फिर स्वयम अपना पुरुषार्थ सिध्द करने मैं असफल रहा हो. आशा करता हूँ के हम सब का मन इन विकारों से मुक्त रहे!!!!!

01 January, 2014

काही तरी महत्वाचे.....................

एका दिवसात सामान्यत: माणूस ३ सिलिंडर भरतील इतक्या प्राणवायूचे (Oxygen) श्वसन करतो.

एका Oxygen सिलिंडरची सरासरी किंमत रु. ७०० आहे.

म्हणजे एका दिवसाला एक माणूस रु. २१०० चा प्राणवायू वापरतो.
...
सबंध वर्षाचा हिशोब करता हि किंमत रु. ७,६६,५०० इतकी येते.

सरासरी आयुष्य जर ६५ धरले तर हीच किंमत साधारणपणे रु. ५ कोटी इतकी येते.
हा प्राणवायू आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या झाडांपासून जवळ जवळ फुकट मिळत असतो.
आणि आपण झाडांची कत्तल करीत सुटलो आहोत.
झाडे लावा!!! झाडे वाचवा!!! झाडे जगवा!!!

श्रेष्ठत्व.

उगवणारा प्रत्येक दिवस हा कोशातून बाहेर येणाऱ्या फुलपाखारासाठी आणि सीमेवर लढणाऱ्या योध्या साठी नवी संजीवनी असणाराच असतो. एक सौंदर्याचे प्रतिक तर दुसरे शौर्याचे प्रतिक. एकीकडे लावण्य तर दुसरीकडे वीरत्व. इकडे निसर्गाने साकारलेली रंगांची सुंदर कलाकुसर तर या बाजूला रणक्षेत्री दिसणारे महारथींचे शास्त्र कौशल्य दोघेही आपल्या जागी सर्वोच्च स्थानी आरूढ झालेले पण जेव्हा प्रश्न श्रेष्ठत्वाचा येतो तेव्हा मात्र स्वतः साठी जगणाऱ्या आणि इतरांना आनंद देणाऱ्या सौंदर्य देवतेपेक्षा इतरांसाठी जगणारी आणि त्यांच्या अस्तित्वासाठी, आनंदसाठी स्वतःच्याही प्राणांची आहुती देणारी समर्पितवृत्तीची क्षात्रदेवता हि अधिक श्रेष्ठ ठरते.

आपण सारेच....

प्रत्येक व्यक्तीला आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहोत असे नेहमीच वाटत असते आणि प्रत्येक जण ते इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो. हे नैसर्गिक आहे. त्यात वाईट असे काहीच नाही कारण 'मी' कोणीतरी वेगळा आहे हे सिद्ध करण्या करिता तो स्वतःचे कर्तुत्व वृद्धींगत करण्यासाठी सदैव प्रयात्नावत असतो आणि त्यातूनच व्यक्तीमत्त्वाच्या विकासही होत जातो,  वैयक्तिक आणि सामाजिक अभिवृद्धीतही भर पडत जाते. पण हे सारे कर्तुत्ववान आणि स्वाभिमानी लोकांसाठी....
         ज्यांचे कर्तृत्वच शून्य आहे त्यांचे काय? त्यांनी स्वतःचे वेगळे पण कसे दाखवायचे? मग आम्ही एक पळवाट शोधतो आम्ही सामोच्या व्यक्तीला पाहून काही मानव निर्मित  विशेषणे तयार करतो, आणि त्याला आणि आपल्याला पर्यायाने सगळ्यांनाच एका मानवनिर्मित गटात, कप्प्यात, खंदकात किंवा दुकानात बसवतो. 

        उदाहरणार्थ:
               समोरचा व्यक्ती जरी याच पृथ्वीवरचा असला तरी त्याचा देश कोणता ?

                                             जर आपलाच तर मग--

                त्याचा धर्म कोणता?

                                             जर आपलाच तर मग--

              त्याची जात कोणती?

                                              आपलीच असेल तर मग--

             त्याचे कुळ (घराणे) कोणते?

अश्या एक न धड हजार प्रश्नांची शृंखलाच उभी करून आपण अनाहूतपणे त्या व्यक्तीला आपण आपल्या पासून वेगळे करून ठेवतो आणि पर्यायाने दुरावून बसतो.
माणसामाणसातील  मित्रात्वास ह्या कृत्रिम बेड्या का असाव्यात? 
आपण कर्तुत्व शून्य आहोत का? मग आपणास स्व-परीचयाच्या  ह्या कृत्रिम साधनांच्या कुबड्यांची खरच गरज आहे का?


कि आपणास कावीळच झाली आहे? इतिहासच बोध घेऊन पुढे जायचे कि ते जळलेले मुदडे उकरून काढायचे? हे आपण सुज्ञानेच ठरवावे.

कळशी स्पर्धा करणाऱ्या या प्रगतीशील जगात आपण काळाच्या बरोबरीने चाललो नाही तर नाश निश्चित आहे. आणि एकत्र चाललो तर विजय निश्चित आहे;
बाकी सुज्ञा बोलणे न लागे!!!!!!!