27 March, 2014

Gravitational Force (गुरुत्वाकर्षण)


विज्ञान जर मातृभाषेतून शिकवले गेले तर विद्यार्थी ते अधिक प्रभावीपणे आत्मसात करू शकतात, असे काही भाषा तज्ञ म्हणतात. मलाही काही अंशी ते पटते. पर्यन्तु त्यासाठी संपूर्ण विज्ञान हे मराठीत शब्दशः भाषांतरित करणे आणि काही इंग्रजी तांत्रिक शब्दांचे भाषांतर करण्याच्या हट्टापायी अधिक क्लिष्ट मराठी पर्यायी शब्द योजने हे अव्यवहारिक ठरेल. उदाहरणार्थ मी बल, गती, त्वरण, गतीय उर्जा या शब्दांऐवजी आपल्याला  अनुक्रमे(respectively) force, velocity, acceleration, kinetic energy हे शब्द जास्त लवकर समजतील त्यामुळेच विज्ञान समजून सांगताना त्यातील तांत्रिक शब्द इंग्रजीमध्ये आणि इतर  विवरण मराठीत करण्याचा प्रयत्न करीत आहे. जेणे करून इंग्रजी शब्दांशी परिचय होईल आणि त्यांचे मराठीतून यथायोग्य स्पष्टीकरणही देता येईल. विज्ञान जास्तीत जास्त सोप्या भाषेत सांगण्याचा मी यथाशक्ती प्रयत्न करीत आहे.
आपण Physics (भौतिक शास्त्र) च्या संदर्भात काही मजेदार गोष्टी जाणून घेऊया. Physics हा मुळ ग्रीक भाषेतील शब्द आहे. ज्याचा इंग्रजीत अर्थ होतो ‘Knowledge of Nature’. Physicsची व्याख्या आपण अशीही करू शकतो ‘the study of matter, energy, and the interaction between them’ अर्थात energy आणि matter यांचा अभ्यास करणारी विज्ञानची एक शाखा.
Gravitational Force (गुरुत्वाकर्षण):
 वस्तुमान (mass) असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंच्या एकमेकांकडे आकर्षिल्या जाण्याच्या प्रवृत्तीला गुरुत्वाकर्षण (Gravitation) असे म्हणतात ई.स. १६८७  च्या सुमारास इंग्रज शात्रज्ञ Sir Issc Newtonयांनी gravitation forceचा शोध लावला. (शोध लावला याचा अर्थ gravitational force हा Issc Newtonच्या आधी अस्तित्वातच नव्हता का? मुळीच नाही, gravitational force हा विश्वाच्या उत्पत्ती पासूनच अस्तित्वात आहे. मग Issc Newtonने त्याचा शोध लावला म्हणजे काय केले? तर Issc Newtonने gravitational force हा सूत्रबद्ध केला.) यालाच Newton’s Law of Universal Gravitation असे म्हणतात. Mathematically
Gravitational force =
F = G M1M2/   r2
येथे
G = Gravitational Constant
M1 आणि M2 = mass of both bodies
  R = दोन्ही वस्तूंमधील अंतर
Mass आणि Weight   या दोन्ही संज्ञा वेगळ्या वेगळ्या आहेत. वजन म्हणजे जमिनीच्या दिशेने असणाऱ्या गुरुत्वाकर्षणा (Gravitational force)मुळे  मिळणारे त्वरण (Acceleration)  आणि वस्तुमान (Mass) यांच्या गुणाकाराएवढे बल (Force)
Mathematically
Weight =m/g
येथे
m = Mass
g = Gravitational Acceleration [पृथ्वीच्या पृष्ठभागावर (on the surface of the earth) g = 9.8 m/s2] म्हणजेच पृथ्वीच्या gravitational forceमुळे असलेले acceleration.
समजा तुमचे पृथ्वी वरील वजन ६० किलो ग्रॅम आहे. तर सुर्य मालेतील इतर ग्रहांवरील तुमचे वजन काय असेल?
१) बुध     (Mercrury)   :      २२.८ किलो ग्रॅम
२) शुक्र     (Venus)     :      ५४.६ किलो ग्रॅम
३) पृथ्वी    (Earth)      :      ६० किलो ग्रॅम
४) मंगळ    (Mars)      :      २२.८ किलो ग्रॅम
५) गुरु      (Jupiter)     :      १५२.४ किलो ग्रॅम
६) शनी     (Saturn)     :      ५५.८ किलो ग्रॅम
७) युरेनस    (Uranus)    :      ४८.० किलो ग्रॅम
८) नेप्चून    (Neptune)   :      ७२.० किलो ग्रॅम




आपणास माहित आहे काय?
१)      Gravity मुळेच आपल्या सूर्यमालेतील पृथ्वी आणि इतर ग्रह सुर्याभोवती अंडाकार कक्षेत (in elliptical orbits) फिरत आहेत.
२)      पृथ्वीच्या विषुववृत्तावर (equator) आणि ध्रुवांवर (poles of the Earth) ‘g’ची value वेगळी आहे.
३)      समुद्रात येणारी भारती आहोटी हि चंद्राच्या gravitational force मुळे होते.
४)      Escape velocity: कोणत्याही rocket पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाण्यासाठी gravitational force चा सामना करावा लागतो. rocket एका विशिष्ट गती पेक्षा जास्त गतीने जर उडाले तरच ते gravitational force वर मत करू शकते त्या गतीला म्हणतात Escape velocity.

सुर्य मालेतील ग्रहांची Escape velocity
a) बुध       (Mercrury)   :      ४.३    किलो मीटर प्रती सेकंद
b) शुक्र       (Venus)     :      १०.३   किलो मीटर प्रती सेकंद
c) पृथ्वी      (Earth)      :      ११.२  किलो मीटर प्रती सेकंद
d) मंगळ     (Mars)       :      ५.०    किलो मीटर प्रती सेकंद
e) गुरु       (Jupiter)      :      ५९.६   किलो मीटर प्रती सेकंद
f) शनी       (Saturn)      :      ३५.६   किलो मीटर प्रती सेकंद
g) युरेनस     (Uranus)     :      २१.३   किलो मीटर प्रती सेकंद
h) नेप्चून     (Neptune)    :      २३.८   किलो मीटर प्रती सेकंद
) सर्वात जास्त gravitational force कोठे आहे माहित आहे?
कृष्ण विवर (Black Hole) हे अवकाशातील असे ठिकाण आहे जिथे gravitational force खूप जास्त आहे. Black Holeची escape velocity एव्हढी जास्त आहे कि त्या मधून प्रकाशही बाहेर येऊ शकत नाही. सुर्यापेक्षा कितीतरीपटीने मोठ्या ताऱ्याच्या जीवनातील हि एक अंतिम स्थिती आहेभारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर यांच्या सिद्धान्तानुसार सूर्याच्या तिपटीहून  जास्त वस्तुमान असलेल्या तार्यांचे कृष्णविवरात रुपांतर होते

04 January, 2014

विकार!!!!

अपने मातृभूमि का त्याग करने कि इच्छा केवल दो प्रकार के व्यक्तिओंके ही मन मैं उत्पन्न हो सकती है. एक जिसके ह्रदय मैं केवल स्वार्थ भरा हो या फिर दूसरा जो अपने ही देश मैं स्वयं का स्थान प्रस्थापित करने मैं या फिर स्वयम अपना पुरुषार्थ सिध्द करने मैं असफल रहा हो. आशा करता हूँ के हम सब का मन इन विकारों से मुक्त रहे!!!!!

01 January, 2014

काही तरी महत्वाचे.....................

एका दिवसात सामान्यत: माणूस ३ सिलिंडर भरतील इतक्या प्राणवायूचे (Oxygen) श्वसन करतो.

एका Oxygen सिलिंडरची सरासरी किंमत रु. ७०० आहे.

म्हणजे एका दिवसाला एक माणूस रु. २१०० चा प्राणवायू वापरतो.
...
सबंध वर्षाचा हिशोब करता हि किंमत रु. ७,६६,५०० इतकी येते.

सरासरी आयुष्य जर ६५ धरले तर हीच किंमत साधारणपणे रु. ५ कोटी इतकी येते.
हा प्राणवायू आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या झाडांपासून जवळ जवळ फुकट मिळत असतो.
आणि आपण झाडांची कत्तल करीत सुटलो आहोत.
झाडे लावा!!! झाडे वाचवा!!! झाडे जगवा!!!

श्रेष्ठत्व.

उगवणारा प्रत्येक दिवस हा कोशातून बाहेर येणाऱ्या फुलपाखारासाठी आणि सीमेवर लढणाऱ्या योध्या साठी नवी संजीवनी असणाराच असतो. एक सौंदर्याचे प्रतिक तर दुसरे शौर्याचे प्रतिक. एकीकडे लावण्य तर दुसरीकडे वीरत्व. इकडे निसर्गाने साकारलेली रंगांची सुंदर कलाकुसर तर या बाजूला रणक्षेत्री दिसणारे महारथींचे शास्त्र कौशल्य दोघेही आपल्या जागी सर्वोच्च स्थानी आरूढ झालेले पण जेव्हा प्रश्न श्रेष्ठत्वाचा येतो तेव्हा मात्र स्वतः साठी जगणाऱ्या आणि इतरांना आनंद देणाऱ्या सौंदर्य देवतेपेक्षा इतरांसाठी जगणारी आणि त्यांच्या अस्तित्वासाठी, आनंदसाठी स्वतःच्याही प्राणांची आहुती देणारी समर्पितवृत्तीची क्षात्रदेवता हि अधिक श्रेष्ठ ठरते.

आपण सारेच....

प्रत्येक व्यक्तीला आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहोत असे नेहमीच वाटत असते आणि प्रत्येक जण ते इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो. हे नैसर्गिक आहे. त्यात वाईट असे काहीच नाही कारण 'मी' कोणीतरी वेगळा आहे हे सिद्ध करण्या करिता तो स्वतःचे कर्तुत्व वृद्धींगत करण्यासाठी सदैव प्रयात्नावत असतो आणि त्यातूनच व्यक्तीमत्त्वाच्या विकासही होत जातो,  वैयक्तिक आणि सामाजिक अभिवृद्धीतही भर पडत जाते. पण हे सारे कर्तुत्ववान आणि स्वाभिमानी लोकांसाठी....
         ज्यांचे कर्तृत्वच शून्य आहे त्यांचे काय? त्यांनी स्वतःचे वेगळे पण कसे दाखवायचे? मग आम्ही एक पळवाट शोधतो आम्ही सामोच्या व्यक्तीला पाहून काही मानव निर्मित  विशेषणे तयार करतो, आणि त्याला आणि आपल्याला पर्यायाने सगळ्यांनाच एका मानवनिर्मित गटात, कप्प्यात, खंदकात किंवा दुकानात बसवतो. 

        उदाहरणार्थ:
               समोरचा व्यक्ती जरी याच पृथ्वीवरचा असला तरी त्याचा देश कोणता ?

                                             जर आपलाच तर मग--

                त्याचा धर्म कोणता?

                                             जर आपलाच तर मग--

              त्याची जात कोणती?

                                              आपलीच असेल तर मग--

             त्याचे कुळ (घराणे) कोणते?

अश्या एक न धड हजार प्रश्नांची शृंखलाच उभी करून आपण अनाहूतपणे त्या व्यक्तीला आपण आपल्या पासून वेगळे करून ठेवतो आणि पर्यायाने दुरावून बसतो.
माणसामाणसातील  मित्रात्वास ह्या कृत्रिम बेड्या का असाव्यात? 
आपण कर्तुत्व शून्य आहोत का? मग आपणास स्व-परीचयाच्या  ह्या कृत्रिम साधनांच्या कुबड्यांची खरच गरज आहे का?


कि आपणास कावीळच झाली आहे? इतिहासच बोध घेऊन पुढे जायचे कि ते जळलेले मुदडे उकरून काढायचे? हे आपण सुज्ञानेच ठरवावे.

कळशी स्पर्धा करणाऱ्या या प्रगतीशील जगात आपण काळाच्या बरोबरीने चाललो नाही तर नाश निश्चित आहे. आणि एकत्र चाललो तर विजय निश्चित आहे;
बाकी सुज्ञा बोलणे न लागे!!!!!!!

10 April, 2013


मरावे पारी राष्ट्र रुपी उरावे।

कदाही स्वाथि सुखत जगावे॥

असे व्यक्त स्वार्थात राष्ट्रीय दैना

असा हा त्रिकलिन सिद्धांत जाणा

18 July, 2010

वारसा टिळकांचा!




गुरुवार, ८ जुलै २०१०फ्रान्समध्ये मार्सेलिस बंदराजवळ ‘मोरिया’ बोटीवरून विनायक दामोदर सावरकर या तरुणाने समुद्रात मारलेल्या त्या इतिहासप्रसिद्ध उडीची आज शताब्दी होत आहे. अर्थातच त्यानिमित्ताने अनेक ऐतिहासिक गोष्टींची उजळणी केली जाणे स्वाभाविक आहे. ज्या काळात सावरकर पुण्यात शिकत होते, त्या काळावर एका तीनअक्षरी महामंत्राचा ठसा होता. तो मंत्र अर्थातच ‘टिळक’ या नावाने सर्वतोमुखी होता. वातावरण स्वातंत्र्याच्या आशाआकांक्षांनी आणि अत्युच्च अशा प्रेरणेने भारावलेले होते. पुणे शहरात फग्र्युसन महाविद्यालयात शिकणारे सावरकर हेही तरुणांमध्ये वक्तृत्वाचे अचाट आकर्षण ठरू लागले होते. बंगालच्या फाळणीने सर्व समाजात संतापाची लाट उसळली होती. त्यातच टिळकांनी परदेशी मालावर बहिष्कार टाकायची हाक दिली. १ ऑक्टोबर १९०५ रोजी भरलेल्या सभेत सावरकरांनी परदेशी मालाच्या होळय़ा पेटवायची भाषा उच्चारली. त्या सभेच्या अध्यक्षस्थानी न. चिं. केळकर हे होते. त्यांनी परदेशी मालाच्या होळय़ा पेटवण्यापेक्षा त्या कपडय़ांना गोरगरिबांमध्ये वाटून टाकायची मागणी केली. हा त्या तरुणांना एका अर्थाने टाकण्यात आलेला पेच होता. त्या दिवशी टिळक पुण्यात नव्हते. तरुणांनी टिळकांना आपले साकडे घातले. टिळकांनी त्यांना सांगितले, की मी विलायती कपडे जाळायला परवानगी देईन, पण तुम्हाला ढिगावारी कपडे जाळता आले पाहिजेत. सावरकरांना हे आव्हान होते. त्यांनी ते स्वीकारले आणि अतिप्रचंड ढीग करून कपडे जाळायची घोषणा केली. ७ ऑक्टोबर १९०५ रोजी पुण्यात विलायती कपडय़ांनी भरलेल्या गाडीची मिरवणूक निघाली. तेव्हाच्या रे मार्केटवरून (आताची महात्मा फुले मंडई) ती तेव्हाच्या लकडी पुलाच्या (आताचा संभाजी पूल) पलीकडे मोकळय़ा मैदानात पोहोचली. या मिरवणुकीत स्वत: टिळकांनी भाग घेतला होता. होळी एकीकडे, तर सभा दुसरीकडे व्हावी अशी सूचना टिळकांनी केली. टिळकांच्या नावाचा दबदबाच एवढा होता, की त्यांना तोंडावर विरोध करायला कुणी धजावत नसे. सावरकरांनी म्हटले, की मग इथपर्यंत तरी आम्ही कशासाठी आलो, त्यापेक्षा मार्केटातच कपडे नसते का जाळता आले? टिळक हे स्वभावत:च लोकशाही मार्गाने जाऊ इच्छिणारे आणि तरुणांच्या विचारांची कदर करणारे! त्यांनी त्या ठिकाणी एवढे प्रखर भाषण केले, की त्या तरुणांमध्ये चैतन्याचे स्फुल्लिंग चेतवले गेले. त्यावर कडी केली ती शिवरामपंत परांजपे यांच्या वक्रोक्तिपूर्ण भाषणाने! परदेशी कपडय़ांच्या होळीने हा इतिहास घडवला. ती परदेशी कपडय़ांची देशातली पहिली होळी ठरली. रँग्लर र. पु. परांजपे हे तेव्हा फग्र्युसनचे प्राचार्य होते. त्यांनी सावरकरांची फग्र्युसनच्या वसतिगृहातून हकालपट्टी केली आणि त्यांना दहा रुपये दंड केला. टिळकांना ती ठिणगी पुरेशी होती. त्यांनी तिचे आणखी एका आगीत रूपांतर कसे होईल ते पाहिले. ‘हे आमचे गुरूच नव्हेत’ या शीर्षकाने त्यांनी ‘केसरी’त अग्रलेख लिहून परांजपे यांच्यावर कडाडून टीका केली. (१७ ऑक्टोबर १९०५) त्यानंतरचे दोन आठवडे टीकेचा हा क्रम त्यांनी चढाच ठेवला होता. सावरकरांचा जन्म १८८३चा आणि टिळकांचा १८५६चा! म्हणजे टिळक त्यांच्यापेक्षा २७ वर्षांनी मोठे होते. युरोपात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी पंडित श्यामजी कृष्ण वर्मा हे शिष्यवृत्ती देतात, हे टिळकांनी सावरकरांच्या कानावर घातले आणि सावरकर त्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरून तिकडे रवाना झाले, इथपर्यंत टिळक आणि सावरकर यांचे गुरू-शिष्याचे नाते जोडले गेले होते. सावरकरांनी श्यामजी वर्माची मर्जी एवढी संपादन केली होती, की त्यांनी इंडिया हाऊसची जबाबदारी सावरकरांवर सोपवून १९०७ मध्ये पॅरिसकडे प्रयाण केले होते. याच काळात टिळकांचे आणखी एक शिष्य सेनापती बापट यांनी लंडनमध्ये बॉम्ब बनवायचे शिक्षण तर घेतलेच, पण त्याच्या कृतीच्या पुस्तिका भारतात पाठवून दिल्या. याच काळात महमद अली जीना यांनी टिळकांचे शिष्यत्व स्वीकारले होते. राजद्रोहाच्या खटल्यात त्यांच्या जामीनकीच्या अर्जावर जीनांनी केलेला युक्तिवाद इतिहासात अजरामर ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले महात्मा गांधीजी हेही टिळकांना गुरू मानत. प्रत्यक्षात जरी त्यांनी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे शिष्यत्व स्वीकारले असले तरी टिळकांना तेही आपले गुरु मानत. गांधीवादी असणारे आचार्य विनोबा भावे हेही टिळकांचे शिष्य होते. पुढे मीरत खटल्यामध्ये ज्यांचा सहभाग होता ते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे तर टिळकांचे शिष्यत्व हे आपले भूषण मानत. थोडक्यात त्या काळच्या सर्व लहानथोर नेत्यांवर टिळक या नावाची मोहिनी होती. सावरकर यांची ती इतिहासप्रसिद्ध उडी ठरली तेव्हा टिळक मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य लिहीत होते. अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या हालअपेष्टांची चर्चा नेहमीच केली जाते, अंदमानात सावरकरांना फिरवाव्या लागलेल्या कोलूचे कष्ट अपरंपार होते. ‘हातीचा घास कधी हटुनि रहावा’, अशी ती अवस्था होती. टिळकांना सोसाव्या लागलेल्या कडक शिक्षेची चर्चा त्या मानाने कमी होते. टिळकांना त्या काळात जडलेल्या व्याधींचे मूळ तिथल्या त्यांच्या शिक्षेत आहे. कल्पना करा, की पाण्यात कडक अशी जाडजूड भाकरी बुडवून खायचा आपल्यापैकी कुणावर प्रसंग आला आहे. टिळकांची त्याबद्दल तक्रार मुळीच नव्हती. हे आत्मिक बळ त्यांच्या अंगी आले ते त्यांनी आपले मन त्या लेखनात गुंतवले होते त्यामुळे! पंडित नेहरूंनी टिळकांविषयी म्हटले आहे, की त्या काळात फारच थोडय़ा व्यक्तींना अविवाद्य असे समाजमनात स्थान लाभले होते, त्यात टिळकांचे नाव सर्वात वरच्या क्रमांकावर होते. ज्या लढय़ाशी गांधीजींचे नाव जोडले गेले आणि ते अजरामर झाले, त्या दक्षिण आफ्रिकेतल्या लढय़ाला सावरकरांनी लंडनच्या कॅक्स्टन हॉलमधल्या सभेत पाठिंबा देऊन तिथल्या हिंदी जनतेच्या हालअपेष्टांबद्दल चिंता व्यक्त केली होती. सावरकरांना फेरअटक करून भारतात आणण्यात आले आणि पुढे अंदमानात त्यांची रवानगी करण्यात आली तेव्हा ती खबर टिळकांना तातडीने कळवायची कोणतीही सोय उपलब्ध नव्हती. त्यांचे भाचे धोंडोपंत विद्वांस त्यांना पत्राद्वारे ही माहिती द्यायचे आणि वर्षांतून एकदा काही मिनिटे होणाऱ्या भेटीत इतिवृत्त कथन करायचे, तेव्हाच त्यांना या घडामोडी कळून येत असत. १९१८ मध्ये सावरकर अंदमानात आजारी पडले, पण त्यांच्या सुटकेविषयी कोणतीही हालचाल झाली नव्हती. टिळकांचे ३१ जुलै १९२०च्या मध्यरात्रीनंतर निधन झाले, तेव्हाही सावरकरांना त्याची गंधवार्ता तात्काळ कळणेही अशक्य होते. मे १९२१ मध्ये सावरकरांना महाराजा बोटीने स्वदेशी आणण्यात आले तरी त्यांची रत्नागिरीच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. पुढे १९२४ मध्ये किमान पाच वर्षे राजकारणात भाग न घ्यायच्या अटीवर त्यांची सुटका झाली. ‘माफी मागून तुम्ही सुटका करवून घ्यावी’, असे टिळकांना सुचवण्यात आले असता त्यांनी त्यास स्वच्छ शब्दांत नकार तर दिलाच होता, पण त्यापेक्षा आपण मरण पत्करू असे ते म्हणाले होते. त्यांनी आपल्या प्रतिनिधींना तसे सुचवू देण्यासही मज्जाव केला होता. परिस्थिती भिन्न होती, मनोनिग्रह त्याहून भिन्न होता. टिळकांना सर्वव्यापी शिष्यवर्ग का लाभला, याचे मूळ त्यांच्या या ठाम विचारांमध्ये सापडते. सावरकरांचा तुरुंगवास चालू होता, तेव्हाच म्हणजे १९१५मध्ये हिंदूमहासभेची स्थापना झाली होती. पुढे दहा वर्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. हिंदूमहासभेचा उदय झाला तेव्हा मंडालेहून सुटका होऊन आलेले टिळक काँग्रेसमध्ये परतले होते, इतकेच नव्हे तर त्यांनी काँग्रेसच्या कामात स्वत:चे सर्वस्व अर्पण केले होते. हिंदूमहासभेची स्थापना मुस्लिमांच्या विरोधात होती, पण त्या स्थापनेनंतर एकाच वर्षांने टिळकांनी मुस्लिमांना मतदारसंघप्रधान योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी लखनौ करार घडवून आणला (१९१६). टिळक आणि जीना हे त्या कराराचे खंदे समर्थक होते. मुस्लिम लीगला काँग्रेसने दिलेले ते उत्तर होते. हसरत मोहानी यांच्यासारखा शायर तर टिळकांच्या प्रेमातच पडला होता. हा इतिहास सावरकरांच्या त्या इतिहासप्रसिद्ध उडीच्या निमित्ताने चितारताना त्या काळाचे स्मरण करणे हा तर उद्देश आहेच, पण याच पानावर त्यांच्या अफाट अशा कर्तृत्वाचे शिल्प चितारले गेले आहे त्याचे बलस्थान टिळकांच्या या वारशामध्ये होते. स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतीकारक होते, पण त्यांचे क्रांतीवीरत्व टिळकांकडे होते.
(दैनिक लोकसत्ता )